♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 |  26 January Speech in Marathi 2022

26-January-Speech-in-Marathi-2022

सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 |  26 January Speech in Marathi 2022

     नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील  आपण  26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत . आपल्या भारतीयांसाठी   26 जानेवारी हा  दिवस  खूप खूप महत्त्वाचा आहे.  आपण सर्व भारतीय हा दिवस आनंदाने उत्साहाने साजरा करतो कारण याच दिवशी  आपला देश प्रजासत्ताक  झाला.

26 जानेवारी या  दिवशी सर्व भारतभर  शाळा , खाजगी  संस्था ,  महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये  विविध कार्यक्रम  आयोजित  केले जातात व या कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्ती  विद्यार्थी आपल्या देशाबद्दल 26 जानेवारीबद्दल  विविध प्रकारची माहिती भाषण करत असतात 

26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi
26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi

 तर मित्रांनो तुम्हाला देखील या  26 जानेवारी  दिवशी  भाषण करायचे असेल त्यासाठी आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने  खास आपल्यासाठी  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण  Republic Day speech www.sandeepwaghmore.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध करून दिले आहे .

26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi

          प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे नाव………….. …………मी इयत्ता ………………मध्ये शिकत आहे .आज मी आपल्यासमोर 26 जानेवारी म्हणजेच  भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे  ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.

                          उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला 

                           नतमस्तक मी त्या सर्वांसाठी 

                          ज्यांनी भारत देश घडविला 

                            अशा या भारत देशाला मानाचा मुजरा.

                     आज स्वतंत्र भारताचा  प्रजासत्ताक दिन आहे.  त्यानिमित्तमित्र आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले .परंतु 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आले म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला . म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

                     प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकां करिता  चालवत असलेले राज्य देशावर कोणत्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवतअसतात

                     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात  यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.   

     

                       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली  खाली 2 वर्ष 11 महीने आणि 7 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.

 या संविधाना मुळेच  नागरिकांना विविध हक्क प्रदान  झाले . संविधानामुळे  भारतदेश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला .आज आपल्या देशामध्ये  न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व  ही तत्वे  हक्क  हे सर्व संविधानाने  आपल्याला प्राप्त झालेले आहेत . 

               ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. आज त्यांचेही स्मरण आपण करावयास हवे. आजही आपले भारतीय जवान आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते 

                                         स्वातंत्र्य वीरांना

                                         करूया शत शत प्रणाम, 

                                         ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच 

                                          भारत बनला महान…..

               आज संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानांचा नेहमी आदर केला पाहिजे . 

                                       ज्या भूमीवर वाहते गोदावरी, 

                                       कृष्णा, यमुना गंगा, 

                                      हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो 

                                      अभिमानाने तिरंगा.

आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय भारत 

तर मित्रांनो ! ” 26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi “ हे भाषण आपणास   निश्चितच आवडले  असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा. 

आपणास हे देखील आवडेल 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती

असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा

 येथे क्लिक करा 

सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

Savitribai Fule Essay in Marathil

सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

     आज आपण या ठिकाणी  सावित्रीबाई फुले निबंधसावित्रीबाई फुले भाषण Savitribai Fule Essay in Marathi तसेच सावित्रीबाई फुले यांचे कार्य ,  सावित्रीबाई फुले माहिती  पाहणार आहोत 

 savitribai phule information in marathi

      सावित्रीबाई फुले savitribai phule या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे .सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला .त्या  शिक्षकासोबत कवयित्री व समाजसुधारक होत्या. 

        सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले ( jyotiba phule )  यांच्याशी झाला . 

         सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या . त्यावरुन ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले .

        1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाड्यात जोतिरावांनी सावित्रीबाईंना मुलींची शाळा काढली .सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊ नये म्हणून त्यांच्यावर चिखल शेण फेकण्यात आले.संपूर्ण कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण  घेतले. शिक्षक मुख्याध्यापक बनून विद्यार्थ्यांना  शिक्षण दिले.

        सावित्रीबाई फुले savitribai phule यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच  शिक्षणाच्या प्रसारासाठी  इतर सामाजिक क्षेत्रांतही काम करण्याची गरज ओळखली. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले .

        त्या काळात समाजात विधवा महिलांवर तसेच विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी ( mahatma phule )  बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. तसेच सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.

     महात्मा फुले ( mahatma jyotiba phule ) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली .आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबाच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.. अनाथांना आश्रम मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते .

    1897 मध्ये  प्लेगची  भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता लेखी लागण झालेल्यांची सेवा केली . दुर्दैवाने त्या स्वतःच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.  सावित्रीबाई फुले यांचे निधन  10 मार्च 1897 रोजी झाले . 

    आपणास या ठिकाणी सावित्रीबाई फुले निबंध ( savitribai phule information in marathi ) 

आपणास हे निबंध देखील आवडतील 

बालदिन सोपा मराठी निबंध 

इंदिरा गांधी निबंध

धनत्रयोदशी का साजरी करतात ? 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

indira gandhi information in marathi

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती | indira gandhi information in marathi ,indira gandhi information in marathi language ,इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi information in marathi) होय. इंदिरा गांधी अशा एक महिला होत्या की त्यांचा केवळ भारतीय राजकारणावरच नव्हे तर जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर प्रभाव राहिला आहे .श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू घराण्यात झाला.

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

नाव (Name)

इंदिरा गांधी
  इंदिरा गांधीचा जन्म (Indira Gandhi Birthday)19 नोव्हेंबर 1917
  इंदिरा गांधी जन्मस्थान (Indira Gandhi Birthplace)उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद  प्रयागराज
इंदिरा गांधी यांच्या  वडीलांचे नाव  (Indira Gandhi’s Father Name)जवाहरलाल नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या आई चे नाव  (Indira Gandhi’s Mother Name)कमला नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव  (Indira Gandhi’s Husband Name)फिरोज गांधी
इंदिरा गांधी यांची  मुले (Indira Gandhi’s Children Name)राजीव गांधी आणि संजय गांधी
इंदिरा गांधी यांना लोकांनी दिलेली पदवीआयर्न लेडी
इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)31 ऑक्टोबर 1984

  

इंदिरा गांधीचा जन्म व लहानपण  (Indira Gandhi’s Birthday)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद मध्ये संपन्न परिवारात झाला त्यांचे नाव इंदिरा प्रियदर्शनी असे होते तर घरी प्रेमाने त्यांना इंदू असे म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला नेहरू होते .

  इंदिरा गांधीचे शिक्षण  

इंदिराजींचा जन्म आर्थिक व भौतिक दृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला होता .  इंदिराजींच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधील विश्वभारती विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर 1937 मध्ये ते ऑक्सफर्ड मध्ये शिकण्यासाठी गेल्या. इंदिरा गांधी यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यथे झाले.

इंदिरा गांधीचे वाचन प्रेम

लहानपणापासून इंदिरा गांधी यांना पत्र पत्रिका आणि पुस्तके वाचण्याचा खूप छान होता त्यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जगातील इतर माहिती प्राप्त झाली यातून इंदिराजी अभिव्यक्तीच्या कला मध्ये  निपून झाल्या त्यांची इंग्रजी भाषेवर खूप छान पकड होती.

इंदिरा गांधीचा विवाह व मुले 

1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी राजीव आणि संजय गांधी यांचा जन्म दिला .

इंदिरा गांधी राजनैतिक करिअर

इंदिरा गांधी यांना राजकीय विचारधारा वातावरण कुटुंबातून वारसा म्हणून मिळाले होते एकोणीशे 1941 मध्ये भारतात आल्यानंतर त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या .1959 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या पंडित नेहरूंच्या निधनानंतर इंदिराजी निवडणूक जिंकून सूचना व प्रसारण मंत्री झाल्या

भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मित निधनानंतर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या .त्यानंतर 1967 ते 1977 सलग तीन वेळा आणि पुन्हा चौथ्या वेळी 1980 ते 84 त्यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली .

सोळा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या शासन काळात अनेक चढ-उतार आले . 1975 मधील आणीबाणी आणि 1984 मधील शीख दंगे यामुळे इंदिराजींना खूप विरोध व आलोचना सहन करावी लागली इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये जागतिक संघटनेचे पुढे न झुकता पाकिस्तानचा पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली .

इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली भारताचे एकतेसाठी यांनी अखंड ते साठी इंदिराजी शहीद झालेल्या इंदिरा गांधी यांच्यातील प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी जागतिक राजकारणाचा इतिहासामध्ये नेहमी नेहमी लक्षात ठेवल्या जातील .

तर मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचे जीवन चरित्र ,जीवन परिचय  इंद्रागांधी मराठी निबंध  indira gandhi information in marathi या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहिली .आपल्याला इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा

तुम्हाला हे देखील आवडेल 

बालदिन सोपा मराठी निबंध

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh

Baldin-Marathi-Nibandh

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh बालदिन सोपा मराठी निबंध , Baldin Marathi Nibandh , children’s day speech in marathi , 14 november day कागदाची नाव होती ,पाण्याचा किनारा होता  मित्रांचा सहारा देण्याची मस्त मन हे वेडे होते  कल्पनेच्या दूनियेत जगत होतो कुठे आलो या समजुतदारीच्या दुनियेत  यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते  … Read more