इ 6 वी सेतू अभ्यास दिवस 42
विषय – मराठी
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील उतारा पाहून सुवाच्य अक्षरांत वहीत लिहिण्यास सांगावे.
कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे ध्यास आणि दुसरी
म्हणजे अभ्यास. शक्ती आणि युक्ती यांचा योग्य वापर केल्यास कोणत्याही कामातील अडचणी दूर
होतात. इच्छित ध्येय साध्य झाल्याशिवाय प्रयत्न अर्धवट सोडून देणे म्हणजे माघार घेणे होय, म्हणून
यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.